A Raja Controversial statement : वाद निर्माण करणारी विधाने करण्याची परंपरा द्रमुक या पक्षाकडून सुरूच असून आता या पक्षाचे स्पेक्ट्रम घोटाळा फेम खासदार ए. राजा यांनी भारत कधीही एक राष्ट्र नव्हते असे विधान केले आहे. भारत एक उपखंड होता असे त्यांनी म्हटले असून त्यांच्या या विधानाला भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला आहे. देश विखंडीत करण्याचाच हा प्रकार असल्याचे भाजपने म्हटले आहे.
पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलतानाचा राजा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ते बोलताना दिसत आहेत. एक अगोदर समजून घ्या की भारत हे एक राष्ट्र कधीही नव्हते. एक राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. त्यातून एक राष्ट्र बनते. भारत एक राष्ट्र नसून एक उपखंड असल्यामागचे कारण काय? तर येथे तमिळ एक भाषा आहे आणि एक राष्ट्र आहे. मल्याळम एक भाषा आणि एक राष्ट्र आहे. ओरिया एक भाषा आणि राष्ट्र आहे. | A Raja Controversial statement
या सगळ्यांचा मिळून एक भारत बनतो. म्हणून भारत एक देश नसून विविध रिवाज, परंपरा, पध्दती आणि संस्कृती असणारा एक खंड आहे. तामिळनाडूत एक संस्कृती आहे आणि केरळमध्ये दुसरी संस्कृती आहे. त्याचप्रमाणे दिल्लीत एक संस्कृती आहे तर ओडिशात दुसरीच. मणिपुरात कुत्र्याचे मांस खाल्ले जाते, तो त्या संस्कृतीचा भाग आहे. काश्मीरची संस्कृती वेगळी आहे. प्रत्येकाच्या संस्कृतीचे वेगळेपण ओळखण्याची गरज आहे. | A Raja Controversial statement
एखादा समुदाय गोमांस भक्षण करत असेल तर ते मान्य करा. तुम्हाला काय अडचण आहे? ते तुम्हाला खायला सांगत आहेत का? ही विविधतेत एकता आहे. आपल्यात वेगळेपण आहे आणि ते स्विकारले पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
यापूर्वी द्रमुकचे नेते आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलीन यांनीही सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. धर्माची तुलना त्यांनी डेंग्यु आणि मलेरियाशी केली होती व त्याच्या उच्चाटनाची गरज असल्याचे म्हटले होते. हे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात आहे व न्यायालयानेही त्यांची कानउघाडणी केली आहे. | A Raja Controversial statement