मुंबई – मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. ईडीचा गैरवापर करून भाजपने षडयंत्र आखले आहे, सोमवारी(दि.8) त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीमध्ये परिवर्तित केले. आगामी काळात नवाब मलिक यांना अंतरिम जामीनासाठी अर्ज करता येईल तसेच ते निर्दोष सुटतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवाब मलिक यांच्यावर होत असलेले आरोप हे बिनबुडाचे असून त्यांना मानसिक त्रास देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे रश्मी शुक्ला, प्रविण दरेकर यांना दोषी असतानाही दिलासा देण्याचे काम सुरू आहे. याचा अर्थ भाजप आपल्या सोयीने शासकीय यंत्रणा वापरत आहे. नवाब मलिक यांची चूक नसताना त्यांना जो मानसिक त्रास दिला जात आहे त्यातून ते लवकरच बाहेर येतील. आमचा भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि देशाच्या संविधानावर विश्वास आहे, असेही ते म्हणाले.