मुंबई – नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा विजय झाल्यावर त्यांनी लगेच कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर कॉंग्रेस नेत्यांकडून बावनकुळेंना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. बावनकुळेंनी केलेल्या टिकेनंतर कॉंग्रेस नेते नसीम खान यांनी बावनकुळेंना काही तिखट सवाल विचारले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे कांग्रेसचे प्रवक्ते आहेत का? त्यांचीच जागा होती, कॉंग्रेसची नव्हती. दोन जागा लढवल्या, त्यात कोल्हापुरात बिनविरोध निवडून आलोय अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते नसीम खान यांनी आजच्या निकालवर दिली आहे. तर 6 महिन्यांपूर्वीच जी जागा भाजपची होती ती आम्ही निवडून आणली, त्यामुळे भाजपला बोलण्याचा अधिकार नाही असेही ते म्हणाले आहेत.
कॉंग्रेसच्या नेत्यांची इमेज खराब करायची, बिनबुडाचे आरोप करायचे ही भाजपची जूनी सवय आहे. मते फुटण्याचा विषय हा भाजपला जास्त माहीत आहे, मत फोडण्यासाठी भाजप पैशांचा वापर करत आहे. याची चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही नसीम खान यांनी केली आहे.