Congress on Modi। देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वपक्षीय नेते जोरदार तयारी करताना दिसून येतायत. त्यातच उत्तर प्रदेशमधील लोकसभा निवडणूक ही यावेळीही रंजक होणार असल्याचे दिसतंय. कारण यंदा काँग्रेसने पुन्हा एकदा वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आपला उमेदवार उभा करणार असल्याचे सांगण्यात येतंय.
उत्तर प्रदेशमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय. दोन्ही पक्षांनी जागावाटपही केले. ज्यामध्ये उत्तरप्रदेशात काँग्रेस १७ जागांवर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, वाराणसीमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा अजय राय यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध उभे करण्याची शक्यता वर्तवली जातीय.
‘यावेळी आम्ही मोदींना काशीत धूळ चारणार’ Congress on Modi।
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपल्या संभाव्य उमेदवारीबाबत अजय राय यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली.यावेळी त्यांनी, ‘यावेळी आम्ही मोदींना काशीत धूळ चारणार’ असा विश्वास व्यक्त केला. अजय राय हे सध्या उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत. मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारी यांना गाझीपूरमधून सपाने तिकीट दिले. यावर बोलताना,’होय ,सपाने त्यांना तिकीट दिले आहे आणि ते सपाच्या चिन्हावर लढत आहेत.असे म्हणत या वृत्ताला दुजोरा दिलाय.
अमेठी आणि रायबरेलीतून कोण लढणार? Congress on Modi।
काँग्रेसच्या वतीने अमेठी आणि रायबरेलीतून कोण लढणार? या प्रश्नाला उत्तर देताना अजय राय म्हणाले, ‘दोन्ही गांधी घराण्यातील पारंपारिक जागा होत्या आणि यापुढेही गांधी घराण्यातीलच राहतील’. असे त्यांनी म्हटले. अजय राय हे पाच वेळा आमदार राहिले आहेत. 1996, 2002 आणि 2007 मध्ये वाराणसीच्या कोलास्ला विधानसभा मतदारसंघातून ते भाजपचे आमदार राहिले आहेत.
2007 मध्ये भाजप सोडल्यानंतर अजय राय यांनी 2009 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून कोलास्ला येथे पोटनिवडणूक जिंकली आणि चौथ्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर वाराणसीच्या पिंद्रा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकून ते पाचव्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी विधानसभा आणि लोकसभेसाठी लढलेल्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.