त्रिपुरा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्रिपुरातील उदयपूर येथे जाहीर सभा आयोजीत करण्यात आली होती. या जाहीर सभेला संबोधीत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काॅंग्रेसवर टीकास्त्र सोडले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “काॅंग्रेसने आपला जाहीरनामा म्हणजेच ढाकोसला पत्र तीन दिवसांपूर्वी जाहीर केला. मात्र आपल्या ढाकोसला पत्राद्वारे काॅंग्रेसने अद्याप एकदाही मध्यमवर्गीयांबाबत भ्र शब्द देखील काढला नाही कारण काॅंग्रेसला माहीत आहे की मध्यमवर्गीयांनीच मोदीला निवडूण दीलं आहे. यामुळेच काॅंग्रेसच्या मनामध्ये मध्यमवर्गीयांबाबत आकस आहे. मध्यमवर्गीयांप्रती असलेल्या तीव्र द्वेषामुळेच काॅंग्रेसने मध्यमवर्गीयांना शिक्षा देण्याचा ठाम निश्चय केला आहे.”
तत्पुर्वी काल महाराष्ट्रातील नांदेड येथे बोलताना माेदींनी, ‘देशामध्ये गरिबी असण्याचे कारण काॅंग्रेस असल्याचे सांगताना जोपर्यंत देशात काॅंग्रेस आहे ताेपर्यंत देशातुन गरिबी हटणार नाही त्यामुळे देशातुन काॅंग्रेसचे समुळ उच्चाटण हाच एकमेव पर्याय आहे.’ असं ते म्हणाले होते.
PM Modi in Udaipur, Tripura: Congress released their manifesto, their 'dhakosla patra' 3 days ago,not even once 'dhakosla patra' mentions middle class,such hatred towards middle class.They think middle class has made Modi win & that's why they're adamant on punishing middle class pic.twitter.com/TnqVg7DIp3
— ANI (@ANI) April 7, 2019