Ram Mandir : अयोध्येत राम मंदिरात भगवान रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. ऐतिहासिक क्षण, जेव्हा 500 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली. भगवान श्री राम अयोध्येतील एका भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संघ प्रमुख मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह संत समुदाय आणि विशेष लोकांच्या उपस्थितीत रामललाच्या श्रीविग्रहाचा अभिषेक पूर्ण झाला. हजारो क्विंटल फुलांनी अयोध्या नगरी नवरीसारखी सजवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासह संत समाज आणि प्रतिष्ठित लोकांच्या उपस्थितीत राम लल्लाच्या मूर्तीचा अभिषेक करण्याचा ऐतिहासिक विधी पूर्ण झाला आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु होण्यापूर्वी त्यांनी आपला ११ दिवस केलेला उपवास महंत गोविंद देव गिरी यांच्या हस्ते सोडला. महंत गोविंद देव गिरी यांनी मंचावरून पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. प्राणप्रतिष्ठापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी ११ दिवस उपवास केला. मोदींनी दिवसातून फक्त दोनदा नारळ पाणी घेतले. तर या उपवासारम्यान मोदींनी देशातील अनेक मंदिरांना भेटी देऊन तेथे पूजाही केल्याचेही महंत गोविंद देवगिरी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, देशभरातील महापुरुषांशी चर्चा करुन आम्ही नरेंद्र मोदी यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी तीन दिवसांचे उपवास करण्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी अकरा दिवसांचे कठोर उपवास केले. त्यांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केला. महाभारतानुसार उपवास हे सर्वात मोठे तप आहे. हे तप करणारा नरेंद्र मोदी यांच्यासारखा तपस्वी राष्ट्रीय नेता मिळणे सोपे नाही. मला या परंपरेला बघून केवळ एका राजाची आठवण येतेय, त्या राजामध्ये हे सर्व गुण होते, त्या राजाच नाव छत्रपती शिवाजी महाराज.
महाराज एकदा मल्लिकार्जुनच्या दर्शनासाठी शैलमला गेले होते. तीन दिवस त्यांनी उपवास केला. तीन दिवस ते शिव मंदिरात राहिले. महाराज म्हणाले मला राज्य करायच नाहीय, मला सन्यास घ्यायचा आहे. इतिहासातील हा विलक्षण प्रसंग आहे, मी शिवाच्या आराधनेसाठी जन्मलोय, मला परत नेऊ नका, त्यावेळी महाराजांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजावलं.
आज असाच महापुरुष आपल्याला मिळालाय. भगवती जगदंबेने हिमालयातून त्याला परत पाठवलय, जा भारतमातेची सेवा कर, तुला भारताची सेवा करायची आहे. काही अशी स्थान असतात, जिथे आदराने आपलं मस्तक झुकतं. मला आज छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामींची आठवण येतेय. त्यांनी महाराजांच निश्चयाचा महामेरु अस वर्णन केलं होतं. असं गोविंद देवगिरी महाराज म्हणाले.