Congress Manifesto On P Chidambaram| लोकसभा निवडणुकांचा पाहिला टप्पा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध घोषणा करण्यात येत आहेत. अशातच आज काँग्रेसने लोकसभा निवडणुकांसाठी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. मतदारांना यामधून अनेक वायदे करण्यात आले आहेत.
अशातच, काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनामा अनावरणाच्या कार्यक्रमात पी चिदंबरम यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी बोलताना चिदंबरम यांनी, थेट काँग्रेसच्या २००४ ते २०१४ या दहा वर्षांच्या कार्यकाळाची, भाजपच्या २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कार्यकाळाशी तुलना केली आहे.
नेमकं काय म्हणाले पी चिदंबरम ? Congress Manifesto On P Chidambaram|
‘काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या, २००९ ते २०१४ या पहिल्या कार्यकाळात विकास दर ८.५ इतका होता. मनमोहन सिंग सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळामध्ये विकासदर हा ७.५ टक्के इतका राहिला. भाजपने राजकीय हेतून ही आकडेवारी बदलली, तरीही काँग्रेस काळातील विकासदर ६.७ टक्के इतका राहिला.’
‘मात्र मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या काळात देशाचा सरासरी विकासदर हा ५.८ टक्के इतकाच राहिला आहे. या मार्चला संपलेलं आथिर्क वर्ष देखील यात जोडलं तरी देखील ही आकडेवारी ५.९ टक्क्यांच्या वर जात नाही.’
‘मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळातील ७.५ टक्क्यांचा विकासदर व मोदी सरकारच्या काळातील ५.९ टक्क्यांचा विकासदर यात फारसा फरक दिसत नाही, असं वाटत असलं तरी, एक मंदावणारी अर्थव्यवस्था व तेजीतील अर्थव्यवस्था हे अधोरेखित करणारा हा फरक आहे.’ असा दावा चिदंबरम यांनी यावेळी केला.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काय ? Congress Manifesto On P Chidambaram|
पक्षाने आपल्या जाहीरनाम्याला ‘न्याय पत्र’ असे नाव दिले आहे. यावेळी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा, पक्षाच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आणि काँग्रेसचे माजी नेते उपस्थित होते.
हा जाहीरनामा 5 ‘न्याय’ आणि 25 ‘हमीं’वर आधारित आहे. जाहीरनाम्यात पाच प्रकारचे न्याय नमूद करण्यात आले आहेत. तसेच 400 रुपये किमान मजुरी , 30 लाख सरकारी नोकऱ्या, गरीब महिलांना 1 लाख रुपयांची मदत, प्रशिक्षणासाठी 1 लाख रुपयांची मदत, शहरी रोजगार हमी योजना अशी आश्वासने देण्यात आली आहेत. राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने लागू केलेल्या चिरंजीवी योजनेच्या तर्कावर, 25 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी कॅशलेस विमा योजना देशभरात लागू केली जाणार आहे. सत्तेत आल्यास जाहीरनाम्यातील आश्वासने देशभर लागू करू असे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले आहे.
भाजप नेते प्रत्युत्तर देणार?
माजी अर्थ मंत्री चिदंबरम यांनी, मनमोहन सिंग यांचे सरकार व नरेंद्र मोदी यांचे सरकार यांच्यामध्ये विकास दराच्या मुद्द्यावर तुलना केली आहे. आकडेवारी सादर करत मनमोहन सिंग यांच्या सरकारची कामगिरी तुलनेने अधिक सरस होती, असेही त्यांनी म्हंटले आहे. चिदंबरम यांच्या दाव्याचे खंडन करण्यासाठी भाजप नेते आता कोणती आकडेवारी समोर आणतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा: