मुंबई – राज्यातील करोनाची रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात करोनाच्या 6 हजार 248 नवीन रुग्णांची भर पडली आहे. दुसरीकडे राज्यात दिवसभरात 18 हजार 942 रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.22 टक्क्यांवर पोहोचले आहे. तसेच राज्यात आज 45 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 12 हजार 233 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.