डॉ. संजय गायकवाड
नोबेल पुरस्कारांची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली. वैद्यकीय क्षेत्रातील तिघा वैज्ञानिकांना यंदाचे नोबेल जाहीर झाले आहे. हे संशोधक वैद्यकीय क्षेत्राला आव्हान देणाऱ्या कर्करोग या आजाराशी निगडीत आहे. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे कर्करोगातील ऍनिमिया आणि पेशींशी निगडीत अनेक आजारांमध्ये उपचाराचा मार्ग खुला झाला आहे. मानवी पेशींची कार्यप्रणाली समजून घेण्याच्या दिशेने जाणारे हे संशोधन आहे. भविष्यात कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना या संशोधनाने दिलासा मिळेल.
वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार तीन वैज्ञानिकांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी केलेले कर्करोगातील ऍनिमिया आणि पेशींविषयी संशोधन यामुळे या सर्वांशी निगडीत असलेल्या इतर आजारांवरील उपचाराचा मार्ग मोकळा होईल. पुरस्कार ज्यांना दिला आहे त्यामध्ये अमेरिकेची विलियम जी केलिन ज्युनिअर, ग्रेग एल सेमेंजा आणि ब्रिटनमधील पीटर जे रॅटक्लिफ यांचा समावेश आहे. विलियम केलिन, हावर्ड विद्यापीठातील आहेत, पीटर रॅटक्लिअप, ब्रिटनच्या फ्रान्सिस क्रिक इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाशी निगडीत आहेत. या तीन वैज्ञानिकांनी मानवी पेशीच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून ती समजून घेण्याच्या दिशेने क्रांतिकारी संशोधन केले आहे.
शरीरातील पेशी ऑक्सिजनची पातळी कशी समजून घेतात आणि त्यावर कशी प्रतिक्रिया देतात, याचा अभ्यास केला गेला. या वैज्ञानिकांनी यातील जीवशास्त्रीय मशीनरीची ओळख करून घेतली आहे जी ऑक्सिजनची पातळी बदलल्यामुळे जनुकांची मिळणारी प्रतिक्रिया नियंत्रित करते.
नोबेल कमिटीच्या निल्स गोरन यांनी या नोबेल विजेत्या वैज्ञानिकांच्या संशोधनाचे महत्त्व समजण्यासाठी एक उदाहरण दिले होते. त्यांनी सांगितले की कर्करोगाच्या पेशी ऑक्सिजनच्या पातळीविषयी प्रतिक्रिया देताना संपूर्ण प्रक्रियाच आपलीशी करतात. असे होत असल्याने रक्तवाहिन्या कर्करोगाच्या पेशी वृद्धिंगत करण्यास मदत करतात. अशा प्रकारे जर रुग्णाचे मूत्रपिंड खराब झाले असेल तर त्याला ऍनिमिया किंवा रक्तपांढरीवर उपचार करण्यासाठी हर्मोन्स द्यावे लागतात.
नव्या संशोधनामुळे अशा प्रकारच्या औषधांवर संशोधन करता येईल ज्यामुळे रोगग्रस्त पेशींचे ऑक्सिजनविषयी असलेल्या हालचालींना लक्ष्य करून त्या रोगग्रस्त पेशीच नष्ट केल्या जातील.
2018 मध्ये ज्या वैज्ञानिकांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्यांच्या संशोधनातूनही कर्करोगाच्या उपचारात मदत होणार आहे. अमेरिकेतील प्राध्यापक जेम्स पी. एलिसन आणि जपानमधील प्राध्यापक तासुकू हॉन्जो यांनी मनुष्याच्या शरीरातील प्रतिकार क्षमतेचा वापर करून कर्करोग निष्प्रभावी किंवा त्याचा प्रभाव पडू न देण्यासाठी नव्या उपचारांचे संशोधन केले. त्या उपचाराला चेक पॉईंट थेरेपी म्हणतात.
कर्करोग संशोधन म्हणजे कॅन्सर रिसर्च यूकेचे प्राध्यापक चार्ल्स स्वांटन यांनी पुरस्कार विजेत्या संशोधकांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या समाजाप्रती उत्तम असलेल्या कामासाठी धन्यवादही दिले. शरीराच्या प्रतिकार क्षमतेने कर्करोगाला प्रतिकूल असणाऱ्या स्वाभाविक शक्तीचा अनुभव घेतला आणि रुग्णांसाठी जीवरक्षक उपायांचा वापर केला. त्वचा, फुफ्फुस आणि मूत्रपिंड आदी प्रगत कर्करोगांवर या प्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या औषधांमुळे रुग्णाचे आयुष्यच बदलून गेले आहे. इम्युनोथेरेपीमुळे उपचारांचा एक नवा मार्ग लाभला आहे. अर्थात आपल्याकडे तो अजूनही प्राथमिक टप्प्यावर आहे. मात्र, भविष्यात या दिशेने होऊ शकणारी प्रगती आणि उपचारांमध्ये उपलब्ध होऊ शकणाऱ्या नव्या संधी यांची कल्पनाच खूप रोमांचित करणारी आहे.
पर्यायी वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात अनेक दशकांपासून कार्यरत असलेली, अग्रणी असलेल्या डीएस रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांनी खाद्यपदार्थांच्या पोषक ऊर्जेपासून कर्करोगाचे औषध सुरू केले आहे. सुरुवातीला मरणासन्न अवस्थेत असलेल्या कर्करोगाच्या रुग्णांवर या औषधाचे परीक्षण केले गेले. या रोग्यांपैकी अनेक जणांवर औषधांचा सकारात्मक फायदा दिसून आला त्यामुळे ते जिवंत आहेत. या औषधाचे अजून एक परीक्षण नुकतेच कोलकाता मधील जाधवपूर विद्यापीठातील निदान संशोधन केंद्रातही केले गेले. सीआरसीचे संचालक डॉ. टी. के. चटर्जी यांनी सांगितल्यानुसार कोलकातामधील डीएस रिसर्च सेंटरने पोषक ऊर्जेपासून तयार केलेले सर्वपिष्टी ह्या औषधाचे जनावरांवर परीक्षण केले गेले. त्याचे परिणाम चांगले होत असल्याचे दिसून आले.
डॉ. चटर्जी यांनी केलेल्या परीक्षणामुळे हे औषध कर्करोगाच्या रोग्यांवर प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. हे औषध अजूनही बाजारात उपलब्ध नाहीये. या औषधाचे संशोधन, विकास डीएस रिसर्च सेंटरचे डॉ. उमाशंकर तिवारी आणि प्रोफेसर शिवाशंकर त्रिवेदी यांनी केले. मात्र, हे दोन्ही वैज्ञानिक सध्या हयात नाहीत. डीएस रिसर्च सेंटरच्या या वैज्ञानिकांनी कर्करोगावरील या यशस्वी औषधाविषयीची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना दिलेली होती. तसेच जागतिक आरोग्य संघटनेलाही माहिती कळवली होती. आतापर्यंत 926 रोग्यांविषयीची माहिती, सखोल माहिती आणि उपचारांच्या माहितीस तीन टप्प्यात जागतिक आरोग्य संघटनेला पाठवण्यात आली होती.
मेंदू, अन्नाशय, यकृत, रक्त, गर्भाशय, स्तन आदी सर्व प्रकारचे कर्करोग झालेल्या मात्र आता सर्वसामान्य आणि आरोग्यदायी जीवन जगत असलेल्या रुग्णांच्या नावाची यादीही त्यात पाठवण्यात आली होती. त्यांना आशा वाटत होती की जागतिक आरोग्य संघटना याची खातरजमा करून घेईल किंवा दहा-पंधरा रुग्णांवर झालेल्या परिणामांची दखल घेऊन हे संशोधन कर्करोगावर विजय मिळवणे शक्य, असा स्वरूपात हे संशोधन प्रकाशित करेल, असे झाले असते तर जगातील वैज्ञानिक, ऑन्कोलॉजिस्ट, चिकित्सक, कर्करोगाचे रुग्ण यांना एक आशेचा किरण दिसला असता. मात्र, या सर्व बाबतीत जागतिक आरोग्य संघटना काहीच प्रतिक्रिया देत नाही, बोलत नाही. कर्करोग हा एक भयंकर विळखा आहे.
कर्करोगाला रोखणे हे मोठेच आव्हान आहे. सुरुवातीला कर्करोगाची लागण झाल्याचे निदान झाले तरच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावशाली धोऱणे आखून ती त्वरित अमलात आणण्याची गरज आहे.
देश असो की परदेश कर्करोगाने कोणताही भेद न करता सर्वदूर आपले हातपाय पसरले आहेत. त्यावर आपल्याही देशात सातत्याने संशोधन सुरू असते. कारण कर्करोगावर नियंत्रण मिळवणे हे खूप मोठे आव्हान आहे. त्यामुळे डीएस रिसर्चसारख्या संस्थांनी केलेल्या संशोधनाचा पाठपुरावा करून, त्याला मान्यता मिळवून घेत त्याचा विस्ताराने वापर व्हायला हवा.