CM Arvind Kejriwal : आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केली आहे. दरम्यान, या छापेमारीनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी खान यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप करत आम्हाला पंतप्रधानांना संपवयाचे असल्याचे म्हटले.
अमानतुल्ला खान यांची आज अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal)यांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी,”आप’च्या नेत्यांवर खोटा खटला सुरू आहे. मोदींच्या कृतीत आणि शब्दात अहंकार आहे. मोदींनी देशाचे वातावरण बिघडवले आहे. सगळेच त्यांना घाबरले आहेत.”असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना ते (CM Arvind Kejriwal)म्हणाले, “आप’ला चिरडण्याचा पंतप्रधान सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. 2015 मध्ये आमचे सरकार बनताच शुंगलू समितीची स्थापना करण्यात आली, 400 फाईल्सची चौकशी करण्यात आली, परंतु कोणतीही अनियमितता आढळून आली नाही. आजपर्यंत आलेल्या सर्व निवाड्यांमध्ये, आमच्यावर आरोप झाले आहेत. त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.”असेहे त्यांनी यावेळी म्हटले.
त्यासोबतच मुख्यमंत्री (CM Arvind Kejriwal)म्हणाले, “गेल्या दोन वर्षांत त्यांनी आमच्या मंत्र्यांना आणि बड्या नेत्यांना अटक करण्यास सुरुवात केली. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात मनीष सिसोदिया यांच्या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायाधीश वारंवार पुरावे नसल्याचे सांगत होते. केंद्र सरकारने न्यायालयात एकही पुरावा सादर केला नाही. मी मोदीजींना आव्हान देतो, जर तुम्हाला एक पैसाही काही सापडला असेल तर मला सांगा. तुम्हाला असे वाटते का की तुम्हाला काही सापडले असते तर तुम्ही मला सोडले असते?
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी (CM Arvind Kejriwal)सांगितले की, दोन दिवसांपूर्वी ज्यांनी ७० हजार कोटींचा घोटाळा केल्याचे सांगितले होते, त्या लोकांवरील सर्व खटले ते त्यात सामील झाल्यामुळे बंद झाले आहेत. मोरबी पुलावर छापा टाकला नाही. कर्नाटकात छापे पडले नाहीत. कॅगच्या अहवालात घोटाळे उघडकीस आले पण छापा पडला नाही. देशाच्या राजामध्ये एवढा अहंकार असेल तर देशाची प्रगती कशी होणार? आज देशातील वातावरण खूपच खराब झाले आहे आणि लोक भारत सोडून इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत. उद्योगपती, व्यापारी, सामान्य जनता आणि प्रसारमाध्यमे सगळेच घाबरले आहेत.