नगर – पोलीस मुख्यालयातील अनेक वर्षांपासून नागरी प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यासाठी लवकरच बांधकाम विभाग, मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक घेवून पोलीस वसाहतीचा विकास आराखडा तयार करुन या भागातील पोलिस बांधवांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणार आहे. असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
पोलीस मुख्यालयातील नाल्यांची व विविध समस्यांची पाहणी करताना खा. सुजय विखे पाटील. समवेत नगरसेवक ऍड. धनंजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर अभियंता सुरेश इथापे, श्रीकांत निंबाळकर, संजय ढोणे, सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक हाटकर, मितेश शहा, मंदार लश्कर, संकेत पवार, सिद्धांत ससाणे, अभिजित ढोणे, चैतन्य जाधव, राहुल मुथा, महेश महादर आदी उपस्थित होते.
यावेळी खा. विखे म्हणाले की, पोलीस बांधव हे समाजातील महत्त्वाचा घटक आहेत. समाजामध्ये 24 तास संरक्षणाचे काम करत आहेत. करोना संसर्ग विषाणूच्या काळात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र नागरिकांच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उभे राहून पहारा देत आहेत. पोलीस बांधवांच्या वसाहतीतील नागरी प्रश्न सोडविणे माझे कर्तव्य आहे, लवकरात लवकर शासन दरबारी पाठपुरावा करुन सोडवणार आहे.
यावेळी ऍड. धनंजय जाधव म्हणाले की, या पोलीस वसाहतीतून मोठे दोन उघडे नाले वाहत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. तसेच या गटार तुंबल्यामुळे पावसाळ्यामध्ये पावसाचे व गटारीचे पाणी पोलिसांच्या घरामध्ये शिरत आहे. त्यामुळे या भागामध्ये पोलिसांना राहणेसुद्धा मुश्किल झाले आहे. राज्य शासनाने वसाहतीचा प्रश्न मंजूर केला आहे. ही कामे लवकरात लवकर सुरु व्हावी, यासाठी पाठपुराव करणार आहे. खा. सुजय विखे यांच्याकडे तत्काळ नाल्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले.