नगर – करोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात मोठ्या वाढतच आहे. नगर शहरातही आता बाहेरुन येणाऱ्या नागरिकांच्या संसर्गामुळे रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आता स्वतःच्या आरोग्याची स्वत:च घेण्याची जास्त गरज असल्याचे विचार आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.
केडगाव-शाहुनगर परिसरात आमदार जगताप यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. माजी नगरसेवक सुनिल कोतकर, बाबासाहेब गाडळकर, राजेश भालेराव यावेळी उपस्थित होते. त्या भागात करोनाचा संसर्ग झालेल्या बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हा परिसर बफर झोन घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या भागातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदार जगताप यांनी या भागाची पाहणी करुन नागरिकांना काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
प्रत्येक नागरिकाने आता स्वत:ची जास्तीत जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. ती घेतल्यास करोनाचा संसर्ग वाढणार नाही. काळजी करण्याऐवजी आता काळजी घ्यावी लागेल. तसेच करोननाचा फैलाव होऊ नये, यासाठी प्रत्येकाने मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. सोशल डिस्टन्सिंगचा नियम प्रत्येकाने पाळवा, असे ते म्हणाले.