नवी दिल्ली – चीनच्या सायबर ठगांनी बनावट कर्ज अर्जाद्वारे कोट्यवधी रुपये तसेच कोट्यवधी भारतीयांचा डेटा चोरला असल्याची माहिती मिळत आहे. आता हे चिनी हॅकर्स पुन्हा त्या डेटाचा वापर करुन लाखो भारतीयांवर हल्ला करु शकतात, अशी शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिनी ठगांनी चोरलेला हा डेटा चीन आणि हॉंगकॉंगमधील सर्व्हरमध्ये लपवून ठेवला आहे. जेणेकरून ते पुन्हा त्याचा वापर करू शकतील. हा डेटा ते वापरू शकतात आणि आपल्या मोबाईलमधील लोन ऍप्स तात्काळ डिलीट करावे.
चिनी हॅकर्स एकदा सेव्ह केलेल्या डेटाचा वापर करुन पुन्हा-पुन्हा बॅंक खात्यातील रक्कम लंपास करण्यासाठी वापर करु शकतात. जर त्यांचा हा हेतू सफल झाल्यास एकाच वेळी देशातील लाखो बॅंक अकाउंट्समधील रक्कम अन्य खात्यात वळविण्याची शक्यता आहे.