मुंबई – आता चंद्रकांत पाटलांशीच बोलले पाहिजे की का ते रोज असं बोलत आहेत. कारण मुख्यमंत्री कार्यरत झाले आहेत. त्यांनी काम सुरू केले असून ते झूमवरून आमच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित होते. त्यामुळे त्यांचे काम कुठे अडले आहे, असं मला वाटत नाही. ते व्यवस्थित काम करत आहेत, असे प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले.
जयंत पाटील म्हणाले, देशातील वातावरण शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर झपाट्याने बदलत आहे. लोकं पर्याय शोधत आहेत. अनेक ठिकाणी कॉंग्रेसचा पर्याय निवडताना दिसत आहे, तर काही ठिकाणी सपाचा पर्याय निवडत आहेत. पण भाजपाला सोडून मतदार दुसऱ्या बाजूला झुकलेला आहे.
उत्तर प्रदेशात तर मंत्रीमंडळातले मंत्री आणि काही आमदार पक्ष सोडून चाललेले आहेत. याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी लगाविला.