मुंबई :– बोगस बियाणे, बोगस खते जर कुणी देत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला तर त्यांना सोडणार नाही. पाऊस जर पुढे सरकला असेल तर कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग शेतकऱ्यांना मदत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचा विचार करणारे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कृषी आणि सहकार विभागाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम महत्त्वाचा आहे, खरीप हंगाम अतिशय चांगला जावा, त्यासाठी बियाणे, खते मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
देशातील 140 कोटी जनता देशात हुकुमशाही आहे की नाही, हे ठरवेल. जनतेला माहिती आहे कि मागच्या 60 वर्षांत देशाला कुणी लुटले आहे. आणि मागील 9 वर्षात देशाचा किती विकास झाला आहे. 70 वर्षांत जे झाले नाही ते मोदींनी 9 वर्षांत करुन दाखवले. 2024 मध्ये आतापर्यंत जे कुणाला जमले नाही तशी कामगिरी मोदींच्या नेतृत्वात होईल. अशा प्रकारे अनेक पक्षाने एकत्र येण्याचा प्रयत्न केला मात्र, अशा बैठकांना काही होणार नाही, असे मत उद्धव ठाकरेंच्या आणि केजरीवाल भेटीवर त्यांनी व्यक्त केले.
बॅंकांवरही कारवाई
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक होणार नाही. आम्ही त्यांच्यासाठी 1 रुपयात पिकविमा आणला आहे. सततच्या पावसामुळे नुकसान भरपाईचा निर्णय असो की शेतकऱ्यांना बियाणांचा तुटवडा भासणार नाही. या सर्वांचे नियोजन करण्यात आले आहे. येणार खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना उत्तम जाईल. ज्या बॅंका आपल्या जबाबदारीने वागणार नाही, शेतकऱ्यांना मदत करणार नाही त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. यावेळी आम्ही सरकार स्थापन केले आहे, पावसाचा अंदाज चुकणार नाही असे मिश्कील टीपण्णीही शिंदेंनी यावेळी केली.