नागपूर – छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजेच हिंदू राष्ट्र असे मत संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आज 350 वर्ष पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच एका कार्यक्रमात डॉ. मोहन भागवत यांनी हे महत्वाचे विधान केले आहे. सध्या त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाचा समारोप कार्यक्रमादरम्यान मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांनी राष्ट्राच्या स्वत्वची घोषणा केली आणि आम्ही हिंदवी स्वराज्य स्थापन करू असे जाहीर केले होते. त्यासाठी त्यांनी मातृभाषेत राज्याचे व्यवहार सुरू केले, नौदल तयार केले, इतर धर्मांत गेलेल्यांना परत हिंदू धर्मात घेतले याशिवाय काशीचे मंदिर तोडणाऱ्या औरंगजेबाला पत्र पाठवत हे थांबविले नाही तर उत्तरेत तलवार घेऊन येऊ असा इशाराही महाराजांनी दिला होता. या देशाबद्दल आपुलकी ठेवणाऱ्यांना त्यांनी सुरक्षित केले. तेच तर हिंदवी स्वराज्य आहे आणि त्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो.”
#WATCH पूरी दुनिया में इस्लाम का आक्रमण हुआ, स्पेन से मंगोलिया तक छा गया। धीरे-धीरे वहां के लोग जागे, उन्होंने आक्रमणकारियों को परस्त किया। तो अपने कार्य क्षेत्र में इस्लाम सिकुड़ गया। सबने सब बदल दिया। अब विदेशी तो यहां से चले गए लेकिन इस्लाम की पूजा कहां सुरक्षित चलती है, यहीं… pic.twitter.com/uBdULvYKY0
— ANI_HindiNews (@AHindinews) June 1, 2023
“स्पेनपासून मंगोलियापर्यंत जगभरात इस्लामचे आक्रमण झाले, परंतु हळूहळू तेथील लोक जागरूक झाले आणि त्यांनी आक्रमकांना पराभूत केले आणि इस्लाम आपल्या कार्यक्षेत्रात संकुचित झाला. जिथे इस्लाम होता तिथे आता सर्व काही बदलले आहे, आक्रमक परकीय येथून गेले आहेत, पण इस्लामची पूजा येथे सुरक्षित आहे. ही आपली मातृभूमी आहे हे विसरून आपण फक्त आपली पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे हे लक्षात ठेवतो. पण समाज म्हणून आपण या देशाचे आहोत, आपले पूर्वज याच देशाचे आहेत, हे वास्तव आपण का स्वीकारत नाही? आपली वैशिष्ट्ये आणि वैविध्य हेच आपल्या विभक्त होण्याचे कारण आहे, परंतु आपण हे विसरता कामा नये,” असेही मोहन भागवत म्हणाले.