Chandrakant Patil| यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. पुन्हा एकदा मोदी सरकारची सत्ता येण्यासाठी भाजपकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. यातच भाजपकडून ‘अबकी बार 400 पार’ चा नारा दिला जात आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यांना दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.
“देशात लोकसभा नावाचे लग्न असून, त्यासाठी सर्वजण मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे याबद्दल सर्वांचे एकमत झाले असून, आमच्यात मतभेद असले, तरी ते आम्ही चर्चेने सोडवू. ज्या वेळी घरात मोठे लग्न असते, तेव्हा वेगवेगळ्या कारणाने विभक्त झालेले कुटुंब एकत्र येतात. त्यानंतर जे पुन्हा वेगळे होतात. किंवा आपण पुन्हा एकत्र येऊयात असाही विचार होतो असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हणाले. यावेळी त्यांनी देशात 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे असल्याचे देखील सांगितले.
पुणे, बारामती, शिरूर या तीन लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वयासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या बैठकांनंतर पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे आदी उपस्थित होते.
दिलेला शब्द सरकार पूर्ण करणार Chandrakant Patil|
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केले. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याचा दिलेला शब्द सरकार पूर्ण करणार आहे. त्यासाठी हा शब्द कायद्यात समाविष्ट केला जाणार आहे. सरकारने याबाबत अधिसूचना काढली असून, त्यावर साडेसहा लाख हरकती नोंदविल्या गेल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी होणार असून, ही मोठी प्रक्रिया आहे. ही कायद्यातील दुरुस्ती असल्याने ती पूर्ण केल्यानंतर विधीमंडळास केवळ त्याची माहिती द्यायची असते. याशिवाय सरकारने मराठा समाजास १० टक्के आरक्षण दिले असून, त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे,’ असे पाटील म्हणाले.
विरोधकांना टोला Chandrakant Patil|
युतीला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. महायुतीने निर्णय घेतल्यानंतर त्यावर टीका करण्याचे काम सुरू आहे. ज्यांना हे आरक्षण देणे शक्य होते, त्यांनी सत्ता असताना दिले नाही. निवडणुका हातून निसटत जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून टीका केली जात असल्याचा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विरोधकांना टोला लगावला.
हेही वाचा:
Jalna| चार्जिंगला लावलेला मोबाईल कानाला लावताच झाला स्फोट; 5 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत