Jalna| जालना जिल्ह्यात चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट होऊन एका चिमकुल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चार्जिंगला लावलेला फोन कानाला लावताच त्याचा स्फोट झाल्याने यात अवघ्या पाच वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या कुंभारी येथे ही घटना घडली आहे.
समर्थ परशुराम तायडे, असं मयत बालकाचे नाव आहे. तो मूळचा संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडमधील आमठाणा गावचा होता. समर्थ हा मामाच्या घरी आला असता ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे/
समोर आलेल्या माहितीनुसार, समर्थ मुलांबरोबर खेळत असताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलजवळ गेला. मोबाईल कानाला लावताच त्याचा स्फोट झाला. यामुळे त्याच्या कानाला आणि हाताच्या बोटाला गंभीर इजा झाली. त्यानंतर त्याला तातडीने तेथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून करून त्याला मृत घोषित केले. Jalna|
दरम्यान, यापूर्वी देखील अशी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूंतील 16 वर्षीय मुलाचा देखील चार्जिंगला लावलेल्या फोनवर बोलत असताना अचानक विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. बिसौली येथील रहिवासी सत्यम शर्मा असे त्या मुलाचे नाव होते. सध्या मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसते. मोबाईल ही काळाची गरज असली तरी त्याचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे देखील गरजेचे आहे. Jalna|
हेही वाचा:
आयकर विभागाने करदात्यांना दिली शेवटची संधी ; ‘या’ तारखेपर्यंत आयटीआर भरण्याच्या सूचना
Pune: कात्रज प्राणिसंग्रहालयातील बिबट्या अद्यापही पसार; नागरिकांना केले ‘हे’ आवाहन