संघर्ष प्रतिष्ठानचा आरोप : ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन
चिंबळी (वार्ताहर) – केळगाव (ता. खेड) गावात आतापर्यंत 11 करोना रुग्ण आढळले असून त्यातील एकाने करोनावर मात केली आहे. त्यामुळे आता 10 ऍक्टिव्ह रुग्ग्ण असले तरी गावात खबरदारीचे उपाय हवे त्या प्रमाणात घेतले नसल्याने गावात आणखी रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तरी याकडे आपण लक्ष घालून उपायोजना राबवाव्यात, या आशयाचे निवेदन संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने ग्रामसेविका भारती म्हेत्रे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच दिलीप मुगंसे वासुदेव मुगंसे सतोंष वहिले रमेश विरकर गुलाब मुगंसे आदि मान्यवर उपस्थित होते. याबाबत तलाठी बी. बी. पाटील यांच्याशी संर्पक साधला असता त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी करोनाचे रूग्ण आढळून आले त्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. तसेच सर्व ठिकाणी साफसफाई व औषध फवारणी करण्यात येत आहे. तर घरोघरी जावून कुटुंबांची माहिती घेतली जात आहे. तसेच विनाकारण घराबाहेर पडू नये अन्यथा कडक कारवाई करण्यात येत आहे, सॅनिटायझर व मास्कचा वापर करावा, वेळोवेळी साबणाने हात धुवावे असे आवाहनही केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.