मुंबई – कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव.याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना “रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता.
यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, यानिमित्ताने आधीच्या 120 दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजाराच्या पार गेली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत 164 तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले. या खात्यांद्वारे 181 तिकिटे काढण्यात आली.
18 मे रोजी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना रिग्रेट असा संदेश दाखविण्यात येत होता. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मध्य रेल्वेने सांगितले.
दरम्यान, कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी हा हमखास आपली कामं सोडून किंवा कामावरच्या सुट्ट्या घेऊन तो गणपतीला आणि शिमग्याला हजेरी लावतो. यावेळी दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणाकोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोणकोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.