– नीलकंठ मोहिते (प्रतिनिधी)
इंदापूर – आपल्या गावासाठी, आपल्या माणसांसाठी काम करण्याची भूमिका त्या गावातील युवकांची असेल तर, गावातील प्रत्येक घटकाला आपले जीवन जगताना आनंद मिळतो.
हाच आनंद देण्याची भूमिका काटी गावात जय हनुमान तरुण मंडळ गेल्या अनेक वर्षापासून यशस्वीपणे घेत आहे. याचा आम्हास अभिमान वाटतो. असे गौरवोद्गार इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे यांनी काढले.
इंदापूर तालुक्यातील मौजे काटी गावात जय हनुमान तरुण मंडळ काटी यांनी गणेश उत्सव निमित्त ओम ब्लड बँक यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी या शिबिराचा प्रारंभ इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील युवक तसेच महिलांनी देखील यावेळी रक्तदान केले.
यावेळी काटी गावचे सरपंच सोमनाथ मोहीते, उपसरपंच सचिन माने, मोहनतात्या गुळवे, सुनिल लवटे, अतुल वाघमोडे, सचिन आरडे, सुधीर गुळवे, गणपत लवटे, रणजित बोराटे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश उत्सवानिमित्त १०१ रक्त दात्याने रक्तदान केले. मंडळाचे यंदा ३८ वे वर्ष होते. मंडळ हे नेहमी विविध सामाजिक धार्मिक उपक्रमात सक्रिय असते. एक गाव एक गणपती ही संकल्पना या गावाने अनेक वर्षापासून जपली आहे.
मंडळाचे अध्यक्ष सतीश वाघमोडे, युवराज पाटील, किरण गुळवे, नवनाथ वाघमोडे, शिवाजी राऊत, दिपक गुळवे, सुहास पवार, तुषार गुळवे, विजय वाघमोडे, कुमार वाघमोडे, भारत कचरे, नाना पाटील, राहुल मोहीते, राहुल बोराटे, शामराव वाघमोडे, आबा वाघमोडे,
सचिन खटके, आण्णा सुळ, महेश कचरे, नंदु वाघमोडे, किरण खरात, गणेश भोसले, वैभव भोसले, बापु सुळ यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष सतीश वाघमोडे यांनी केले तर आभार सुनील लवटे यांनी मानले.