नवी दिल्ली: झारखंड विधानसभेच्या 81 जागांवरील निवडणुकांच्या निकालावरून हे स्पष्ट झाले आहे की भारतीय जनता पक्षाची सत्ता कमी होताना दिसत आहे. झारखंडमध्ये मतमोजणी सुरू असून भाजप केवळ 23 जागांवर आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे युती सरकार झारखंडमध्ये तयार होताना दिसत आहे.
कॉंग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांनी भारतीय जनता पक्षाच्या हस्ते राज्य सत्ता गमावल्याबद्दल ट्विट केले आहे. पी. चिदंबरम यांनी भाजपवर जोरदार टीका केली आणि म्हणाले की, हरियाणामध्ये भाजपाला झटका बसला आहे, महाराष्ट्राने भाजपला नकार दिला गेला आणि झारखंडमध्ये पराभव पत्करावा लागला. 2019 मधील भाजपाची ही कहाणी आहे. संविधान वाचविण्यासाठी प्रत्येक बिगर भाजपा पक्षाने कॉंग्रेससमवेत पुढे यायला हवे.