मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप आज (दि. ९) मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्च्याचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. भाजपचा हा मोर्चा आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा असा असणार आहे.
याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांच्यासहित इतर नेत्यांनीही काल (दि. ८) पोलीस आयुक्तांची भेट देखील घेतली. भाजपने या मोर्चासाठी आझाद मैदानात एक मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले, असून शेकडो खुर्च्या आणि बॅनर्स या ठिकाणी लावले आहेत. फक्त आजाद मैदान नाही तर मुंबईतील अनेक महत्वाच्या ठिकाणी भाजपने बॅनर्स लावले आहेत.