पाटणा – ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत ती राज्ये अस्थिर करण्याचा हरप्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून केला जातो अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केली आहे.
यावेळी महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावरही भाष्य केले.
तेजस्वी म्हणाले की, महाराष्ट्रात आज जे काही चालले आहे ते सगळे पूर्वनियोजित असल्यासारखे दिसते आहे. ते (भाजप) तुम्हाला दबावाखाली आणतात, घाबरवतात किंवा विकत घेतात.
बिहारमध्येही येथील जनतेने भाजपला नाकारले होते. मात्र मुख्यमंत्री नितीश कुमार दबावाखाली आहे व त्यामुळे भाजप सत्तेवर आहे.