मुंबई – “देशात अराजकता माजली आहे. मणिपूर जळत असताना सरकार हातावर हात देऊन बसले आहेत. तेथील परिस्थिती राज्यकर्त्यांना नियंत्रणात आणता येत नाहीये आणि अशा परिस्थितीत भाजप-आरएसएसचे गुंड समाजात धार्मिक द्वेष, जातीयवाद आणि असत्य पसरवीत आहेत,’ असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
तसेच, भाजपच्या या द्वेषाच्या राजकारणाविरोधात आम्ही उभे आहोत असे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. आंबेडकर पुढे म्हणाले की, मी अकोल्यातील एका मुस्लिम व्यक्तीच्या मालकाच्या भोजनालयात दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम अशा वेगवेगळ्या समूहांतील सहकाऱ्यांसोबत “चिकन तंदुरी’, “फीश फ्राय’ आणि माझ्या आवडत्या मटण बिर्याणीचा आस्वाद घेतला.
परंतू असे हे वातावरण भाजपमुळे कुठे तरी लोप पावताना दिसत आहे. त्याचमुळे आपण खऱ्या भारताची परिभाषा गमावून बसत आहोत, असेही आंबेडकर पुढे म्हणाले.