नवी दिल्ली – ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेवबाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी 15 दिवसांत माफी मागावी अथवा एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या नोटिसीत केली आहे.
तर दुसरीकडे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. तर त्यांच्या याच विधानाला समर्थन देत उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
ते म्हणाले, ‘अॅलोपॅथी डॉक्टर रुग्णाला आयसीयूमध्ये ठेऊन पैसे वसूल करतात. त्यांचा उपचारपद्धतीमध्ये १० रुपयांची औषध दुप्पटपटीने विकतात. मात्र आयुर्वेदिक उपचार पद्धतीत असं नसून सर्वानी आयुर्वेद आणि योग्य स्वीकारायला हवे. ते पुढे म्हणाले,अॅलोपॅथी डॉक्टरांना राक्षस म्हटलं आहे. अॅलोपॅथीचे काही डॉक्टर राक्षसांपेक्षाही वाईट काम करत आहेत. ‘
‘त्यांनी मनापासून बाबा रामदेव यांचं अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, रामदेव बाबांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून सदृढ भारत, सशक्त भारत मोहीम सुरु केली असून हे काम कौतुकास्पद आहे. सुरेंद्र सिंह यांनी बाबा रामदेव यांची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं.’