हमीरपूर (हिमाचल प्रदेश) – भाजपचे नेते जयराम ठाकूर (BJP leader Jairam Thakur) यांनी हिमाचलातील लोकनियुक्त कॉंग्रेस सरकार (Congress government) पैशाच्या बळावर पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Himachal Chief Minister Sukhvinder Singh Sukhu) यांनी केला आहे.
एएनआयशी बोलताना सुखू म्हणाले, पैशाचा वापर करून जनतेच्या मतांच्या आधारे निवडून आलेले सरकार पाडण्याचा जयराम ठाकूर यांनी केलेला प्रयत्न हा लोकशाहीचा खून आहे. त्याची हिमाचलच्या जनतेला जाणीव आहे. त्यामुळे १ जून रोजी राज्यातील जनताच निर्णय घेईल असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे अपात्र ठरलेले सहाही आमदार- राजिंदर सिंग राणा, सुधीर शर्मा, चैतन्य शर्मा, रवी ठाकूर, इंदर दत्त लखनपाल आणि दविंदर भुट्टो यांनी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिषेक मनु सिंघवी यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांच्या बाजूने क्रॉस व्होट केले होते.
याव्यतिरिक्त, तीन अपक्ष – होश्यार सिंग, आशिष शर्मा आणि के.एल. ठाकूर यांनीही भाजपला समर्थन दिले हेाते. काँग्रेस आमदारांच्या अपात्रतेमुळे रिक्त झालेल्या हिमाचल प्रदेशमधील विधानसभेच्या सहा जागांसाठीची पोटनिवडणूक १ जून रोजी लोकसभा निवडणुकीसोबतच होणार आहे.