PM Narendra Modi IN Nagpur – तुम्हाला यंदा फक्त खासदार निवडायचा नाही तर पुढच्या हजार वर्षाच्या मजबूत भारताचा पाया रचायचा आहे. काँग्रेसने आतापर्यंत देशातील ओबीसी, एससी आणि एसटी लोकांकडे दुर्लक्ष केलं, पण गेल्या दहा वर्षात त्यांच्यासाठी अनेक कामं होऊन त्यांच्या भवितव्याची नवीन मार्ग सुकर झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.
गेल्या दहा वर्षात फक्त जेवणापूर्वी जे समोर येतं ते अॅपेटायझर आलं आहे, आता विकासाची पूर्ण थाळी समोर यायची आहे असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या नितीन गडकरी आणि राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नागपुरात आले होते. यावेळी जाहीर सभेत ते बोलत होते. (Prime Minister Narendra Modi’s speech in Nagpur)
कॉंग्रेसवाल्यांनी एससी, एसटी, ओबीसींना वंचित ठेवले – मोदी
कॉंग्रेसवाल्यांनी कधीही बाबासाहेबांचे संविधान लागू केले नाही. 370 कलम हटवले तर काश्मीरमध्ये कुठेही आग लागली नाही, हे तेथील लोकांना देखील मान्य झाले. दुसरी गोष्ट म्हणजे कॉंग्रेसवाले म्हणतात की, 370 हटवल्याने देशाला फायदा काय झाला. अरे यांना काय माहित आहे की, तेथील एससी, एसटी, ओबीसी यांना त्यांच्या वंचित अधिकारापासून लाभ झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील मोठे मुद्दे –
– मोदी पुन्हा सरकारमध्ये आले तर लोकशाही आणि संविधान संकटात येईल, असे इंडिया आघाडीवाले खोटे पसरवत आहेत.
– मी जेव्हा राजकारणात आलो आहे तेव्हापासून अशी कोणतीही निवडणूक राहिलेली नाही ज्यामध्ये विरोधकांनी अशी भाकडकथा ऐकवलेली नाही.
– अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार बनलं तेव्हाही ते असेच गीत गात होते. याचा अर्थ यांच्याकडे नवी कल्पनाही नाही.
– आणीबाणीच्या वेळी लोकशाही धोक्यात नव्हती का?
– 19 एप्रिलला तुम्हाला फक्त एक खासदार निवडायचा नाही तर पुढच्या एक हजार वर्षाचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान करायचं आहे.
– आपल्याला विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचं आहे.
– निवडणुकीबाबत मीडियाकडून सर्व्हे दाखवला जातोय. त्यात एनडीएचा बंपर विजय दाखवला जातोय. या सर्व्हेच्या मागे मीडियावाले इतका खर्च का करता? त्यांना पैसे वाचवण्याचा एक फॉर्म्युला देतो. मोदीला जेव्हा शिव्या वाढायला लागल्या तर समजा पुन्हा मोदी जिंकून येणार.
– जेव्हा विरोधक माझ्या आई-वडिलांबद्दल मला अपशब्द बोलतात तेव्हा समजून जायचं पुन्हा एकदा मोदी सरकार.
– ईव्हीएम प्रश्न उपस्थित झाले तेव्हा समजून जा पुन्हा एकदा मोदी सरकार येणार हे समजून घ्या.
– एका गरिबाचा मुलगा पंतप्रधान बनताच त्यांना लोकशाही आणि संविधान धोक्यात दिसत आहे.
– इंडिया आघाडीवाले कधीही गरिबांना पुढे जाताना बघू शकत नाहीत.
– मराठीत एक म्हण आहे, काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. पाण्यात कितीही लाठी मारा. पाणीत भेद होणार नाही.
– गरिबाच्या मुलावर या लोकांनी कितीही हल्ला केला तरी मोदी देशाच्या संकल्पनांसाठी मागे हटणार नाही.
– इंडिया आघाडीवाले पूर्ण ताकदीने देशाचे विभाजन करायला लागले आहेत. त्यांना माहिती आहे की, देशातील सर्वजण एकजूट झाले तर त्यांचं राजकारण संपून जाईल.