काबुल : अफगाणिस्तानवर तालिबान बंडखोरांनी पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सत्ता हस्तांतराबाबत चर्चा करण्यासाठी तालिबानचे मध्यस्थ रविवारी अध्यक्षीय राजवाड्यात पोहोचले. सरकारच्या बाजूने माजी अध्यक्ष हमीद करझई आणि अफगाण राष्ट्रीय सलोखा परिषदेचे प्रमुख अब्दुल्ला वाटाघाटी करणार आहेत. या धुमश्चक्रीवेळी जागतिक स्तरावरून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नव्हती. आता मात्र अगदी गल्लीपासून अमेरिकेपर्यंत अनेकविध देश आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
यातच भारतातील अनेकांनी तालिबान्यांची तुलना भारतातील राजकारणी आणि अनेक चर्चित विषयांशी केली आहे. असे काहीसे पश्चिम बंगालमध्ये बघावयास मिळाले आहे. पश्चिम बंगाल राज्याचे भाजपचे बंगाल महासचिव सयांतन बसू यांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराची तुलना भारताशी केली आहे.
ते म्हणाले,”लेडी तालिबान पाहायचं असेल, तर कालीघाटमध्ये या’ अशा शब्दांमध्ये ममतांवर टीका केली आहे. बंगालमध्ये विरोधी पक्षाचा अधिकारांवर तृणमूल सत्तेत आल्यापासून गाद आणली जात आहे. बंगालमध्येही तालिबानी शासनच सुरू आहे. जर कोणाला तालिबान पहायचं असेल, तर काबुलला जाण्याची गरज नाही.’