मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भुंकप घडला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आज शपथविधी सोहळा पार पडला आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपा ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते.
त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे.. https://t.co/L42b0t0Nyh— Sanjay Raut (@rautsanjay61) July 2, 2023
संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या शपथविधी सोहळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. “भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहे,” असे संजय राऊत यांनी ट्वीट करत लिहिले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्या सोबत 35 आमदार आहेत. या संपूर्ण घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.