कुचबिहार – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे देऊन तृणमुल कॉंग्रेसचे कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे असा आरोप तृणमुल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
त्यांनी या संबंधात काहीं उदाहरणेही पुढे केली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, भाजप नेत्यांनी माझ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुब्राता बक्षी यांनाही फोन करून त्यांना पैशाचे अमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला.
भारतीय जनता पक्षाला कसलीही राजकीय संस्कृती किंवा तत्वज्ञान उरलेले नसून हे केवळ सत्तेसाठी हपापलेले संधीसाधू आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे. पण त्यांच्या या पैशाच्या थैलीच्या प्रभावाला आम्ही पुरून उरू असेही त्यांनी नमूद केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत आमचाच पक्ष निर्वीवादपणे निवडून येईल असे त्या म्हणाल्या.