पाटणा – बिहार विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना भाजपाची डोकेदुखी वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या जेडीयुसह विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या लोकप्रियतेत घट झाल्याने, आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि प्रचंड लोकप्रियता असूनही भाजपा नेतृत्व बिहारबद्दल चिंतेत आहे. अशातच आपली ही अखेरचीए निवडणूक असल्याने, आता तरी आपण मलाच मतदान करावे, अशी निराशाजनक भाषा वितेशकुमार यांनी केल्याने, बिहारमध्ये सत्तांतर होणार का, एवढीच उत्सुकता आता उरली आहे.
लॉकडाऊन दरम्यान प्रवासी मजुरांना हाताळण्यात अपयश, पूर आणि कोरोना महामारीचा सामना करण्यात नितीश कुमार सरकार अपयशी ठरलं आहे. बिहारमध्ये एनडीए निवडणूक हरली तर भाजपाला येणाऱ्या काळात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. नितीश कुमार यांच्या घसरत्या लोकप्रियतेबाबत भाजपाला माहिती नाही असं नव्हे, आरएसएस आणि भाजपाने केलेल्या सर्व अंतर्गत सर्वेक्षणांमध्ये हे स्पष्ट झालं होतं की बिहारमधील लोक आता नितीशकुमारांना पसंत करत नाहीत.