नगर – गेल्या 9 वर्षांत भाजप सरकारने फक्त घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात सर्वसामान्यांना न्याय देण्यात अपयश ठरले आहेत. भाजपाने केलेल्या घोषणानेप्रमाणे ना शिवस्मारक तयार झाले, ना काळे धन परत आले, ना रोजगार उपलब्ध झाला, ना महागाई कमी झाली, अशा अनेक आघाड्यांवर हे भाजपाचे सरकार अपयशी ठरले आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांचे काही देणे-घेणे नसल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत असल्याचे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी सांगितले.
नगर शहर शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने “होऊ द्या चर्चा…’ या कार्यक्रमाचे माळीवाडा येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख कदम बोलत होते. या वेळी युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, विजय पठारे, दत्ता कावरे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, दिपक खैरे, सुरेश तिवारी, अरुणा गोयल, गौरव ढोणे, संजय आव्हाड आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.भगवान फुलसौंदर म्हणाले, भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी खोटी आश्वासने देऊन जनतेचे फसवणुक केली आहे. फक्त घोषणा करणे एवढेच काम ते करत आहेत. विरोधकांना धाक दाखवून दडपशाही, हुकूमशाहीने राज्य चालवत आहे.