जळोची – आतापर्यंत या देशांमध्ये काही अपवाद सोडला तर निवडणुका अतिशय मोकळ्या वातावरणामध्ये झालेल्या आहेत. हे आत्ताचं जे मोदींचं सरकार आल्यानंतर यावेळची निवडणूक किती सुयोग्य वातावरणात होईल, मोकळ्या वातावरणात होईल याची शंका आम्हा सगळ्यांना आहे. त्याची काही कारणे आहेत. या कारणांमध्ये असं दिसतं की, अलीकडं सरकारच्या ईडी, सीबीआय, आयकर सारख्या एजन्सींचा गैरवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. अशी प्रतिक्रिया जेष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याचे पहिले उदाहरण असे की, काँग्रेस पक्षाचे बँकेचे अकाउंट सील केले आहे. त्यांचे अकाउंट गोठवल्यामुळे त्यांच्या प्रचार यंत्रणेला जे नियोजन केलेले होते. ते पूर्ण कोलमडले आहे. छपाई थांबली, लोकांचा प्रवास थांबला, बाकीच्या सुविधा या सगळ्या गोष्टी या पद्धतीने त्यांचे खाते गोठवून थांबवलेल्या आहेत. एका दृष्टीने देशातील महत्त्वाच्या पक्षाला आज प्रचार करण्यासाठी साधनसामग्री ही सुद्धा उपलब्ध करून द्यायची नाही. अशी टोकाची भूमिका यापूर्वी कधी झाली नव्हती. ती आता झालेली आहे.
दुसरी गोष्ट अशी आहे, राज्याचे प्रमुख नेते जे आहेत, त्या प्रमुख नेत्यांच्यावर ज्या अशा एजन्सी आहे त्यांचा वापर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचे पहिले उदाहरण म्हणजे झारखंडचे मुख्यमंत्री. हे आदिवासींचे राज्य आहे. आदिवासींच्या राज्यात अतिशय त्यांचा प्रभाव आहे, अशा व्यक्तीला काही वेगळ्या ऑर्डर करून चौकशी लावून त्यांना तुरुंगात टाकले आहे.
आता अरविंद केजरीवाल यांनाही तसेच केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला वाटत होते की, त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली जाईल. त्यांना आत्तापर्यंत सात ते आठ समस्त पाठवले आणि काल त्यांना अटक केली अटक का केली? तर त्यांच्याबद्दल प्रत्येक राज्यामध्ये मध्य धोरण असते आणि त्याची पॉलिसी तयार करण्याचे अधिकार मंत्रिमंडळाला असतो.
शेवटी मंत्रिमंडळ म्हणजे त्या राज्याच्या वेगवेगळ्या प्रकारची धोरण ठरवण्याची अधिकृत यंत्रणा असते. त्या मंत्रिमंडळाने ती पॉलिसी ठरवली, त्या पॉलिसीमध्ये काही चुकलं असेल किंवा त्यामध्ये आणखी काही गोष्टी असतील, तर लोकांच्या समोर जायला पाहिजे.
निवडणुकीमध्ये मुद्दे उपस्थित करायला पाहिजेत. कायदेशीर काही गैर असेल तर कोर्टामध्ये गेले पाहिजे परंतु असे न करता तिथल्या एक ते दोन मंत्र्यांना यापूर्वी अटक केली त्यांचे जे राज्यसभेतले नेते आहेत त्यांना अटक केली आणि काल थेट मुख्यमंत्र्यांना सुद्धा अटक केली.