पाटणा – राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मंत्री तेजस्वी यादव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाले असून ते बिहार आणि केंद्र सरकार यांना लक्ष्य करणारी टीका रोज करत आहेत. आताही बिहारमधील मंत्र्यांच्या आणि भाजप नेत्यांचा आपल्याच डबल इंजिन सरकारवर विश्वास राहीला नसल्याचा निशाणा त्यांनी साधला आहे.
उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदार यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली जाते आहे. यावरूनच बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसल्याची बाब अधोरेखित होते आहे. जे नेते स्वत:ची सुरक्षा करू शकत नाहीत अथवा स्वत:च्या सुरक्षेबाबत साशंक असतील ते जनतेला काय सुरक्षेची हमी देणार असा सवाल त्यांनी केला.
केंद्राच्या भरवशावरच स्वत:ची सुरक्षा करण्याचा या घाबरटांचा इतिहास आणि संस्कार आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. भाजपच्याच जंगलराजमुळे त्रस्त असलेल्या त्यांच्याच पक्षाच्या डझनभर फुटकळ नेत्यांना सुरक्षा देण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बिहार में विधि व्यवस्था व सरकार संचालन की स्थिति बद से बदतर हो गई है।स्थिति इतनी अविश्वासपूर्ण,अराजक और विस्फोटक है कि BJP के उपमुख्यमंत्री,मंत्रियों,विधायकों व सांसदो को अपनी ही राज्य सरकार की पुलिस और सुरक्षा व्यवस्था पर यकीन नहीं रहा तो कहा ही क्या जाए? https://t.co/LzAqMoD4Ro
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) July 1, 2022