Bihar Political Crisis – बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा एकदा ‘पलटी’ डाव टाकण्याच्या तयारीत आहेत. २०२० विधानसभा निवडणुकांनंतर भाजपसोबत जुळत नसल्याने, नितीश कुमार यांनी ‘एनडीए’मधून फारकत घेतली होती. सध्या नितीश कुमार यांची जेडीयू, लालू प्रसाद यांची राजद व काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत आहे.
मात्र लोकसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपसोबत जाण्याच्या रतयारीत आहेत. विरोधी पक्षांची मोट बांधण्यामध्ये पुढाकार घेतलेले नितीश कुमारचं आता भाजपसोबत जात असल्याने इंडिया आघाडीला हा मोठा तडा मानला जात आहे.
बिहारमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय जनता दलाची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्याबाबत केलेल्या उल्लेखाने बिहारच्या राजकारणात आजपर्यंत जे घडलं नाही, ते घडणार काय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
काय म्हणाले तेजस्वी यादव?
ANI या वृत्तसंस्थेने सुत्रांकरवी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव यांनी या बैठकीमध्ये, नितीश कुमार कालही आदरणीय होते, आजही आदरणीय आहेत असं वक्तव्य केल्याचं समजतंय. नितीश कुमार यांच्या हातात गोष्टी नव्हत्या असेही तेजस्वी यादव म्हंटल्याचं सूत्रांची सांगितलं आहे.
बिहार में अभी खेल होना बाकि है
बैठकीमध्ये बोलताना तेजस्वी यादव यांनी, ‘बिहार में अभी खेल होना बाकि है’ असं वक्तव्य केल्याचेही सूत्रांनी सांगितले. या वक्तव्यातून तेजस्वी यांना नेमकं काय सुचवायचं होत याबाबत वेगवेगळे कयास बांधले जात आहेत.
बिहारमध्ये आरजेडी सर्वात मोठा पक्ष
२४३ संख्याबळ असलेल्या बिहार विधानसभेत आरजेडीचे ७९ आमदार आहेत, त्यापाठोपाठ भाजपचे ७८, JD(U) चे ४५, काँग्रेसचे 19, CPI (M-L) चे 12, CPI(M) आणि CPI चे प्रत्येकी दोन, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) चे चार आणि AIMIM चा एक, तसेच एक अपक्ष आमदार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
नितीश कुमारांचा डाव अन् सावध काँग्रेसकडून उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये…
नितीश कुमार आजच पलटी मारणार? महाराष्ट्रातला बडा नेता बिहारमध्ये…