Punjab BJP On APP| ईडीने दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा आपसह विरोधी पक्षाकडून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. यातच भाजपने आणखी काही गंभीर आरोप केले आहेत. पंजाब भाजपचे प्रमुख सुनील जाखड यांनी पंजाबच्या आप सरकारने राज्यातील उत्पादन शुल्क धोरणाबाबत कट रचून हजारो कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडीच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
“ज्या उत्पादन शुल्क धोरणासाठी केजरीवाल यांना आजचा दिवस पाहावा लागला, त्याच मॉडेलची त्यांच्या सरकारने पंजाबमध्ये पुनरावृत्ती केली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केजरीवालांच्या लोकांना मुख्यमंत्री कोट्यातील पॉश सेक्टरमध्ये मोठी घरे देऊन प्रॉक्सीद्वारे राज्याची लूट करण्याची परवानगी दिली आहे. आप सरकारच्या हातून पंजाबला आणखी नुकसान होण्यापासून वाचवण्यासाठी पंजाबच्या उत्पादन शुल्क धोरणाची ईडीकडून चौकशी करणे आवश्यक आहे,” असे जाखड म्हणाले. याशिवाय त्यांनी मुख्यमंत्री भगवंत मान आणि खासदार राघव चढ्ढा यांना केजरीवाल यांच्या भ्रष्ट कारभाराची माहिती असल्याचा आरोप केला आहे. Punjab BJP On APP|
पुढे ते म्हणाले की, “केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर लगेचच राजीनामा द्यायला हवा होता, मात्र केजरीवाल हेच मुख्यमंत्री राहतील असे त्यांच्या पक्षाचे नेते सांगत आहेत. यावरून असे दिसून येते की आप प्रमुखांचा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर विश्वास नाही आणि पक्ष सत्तेचा भुकेलेला आहे. केजरीवाल हे अबकारी धोरण प्रकरणात तुरुंगात जाणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून इतिहासात नोंदले जातील.” Punjab BJP On APP|
दरम्यान, राष्ट्रीय राजधानीच्या तत्कालीन अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गुरुवारी रात्री आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक केली. यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय राजधानी आणि काही राज्यांमध्ये जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.