नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान सुरू असणाऱ्या प्रचंड तणावाच्या वातावरणात जपानने भारताला भक्कम पाठिंबा दिला आहे.
जपानचे भारतातील राजदूत सतोशी सुझुकी म्हणाले, भारत आणि चीन दरम्यान असणाऱ्या प्रत्यक्ष ताबा रेषा एकतर्फी बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना जपान विरोध करेल. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांच्यासोबत उत्तम चर्चा झाली. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थितीची त्यांनी माहिती दिली. या मुद्द्यावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा शोधण्याची भारत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
Had a good talk with FS Shringla. Appreciated his briefing on the situation along LAC, including GOI’s policy to pursue peaceful resolution. Japan also hopes for peaceful resolution through dialogues. Japan opposes any unilateral attempts to change the status quo.
— Satoshi Suzuki (@EOJinIndia) July 3, 2020
जपानलाही या मुद्द्यावर शांततापूर्ण पध्दतीने आणि संवादाच्या मार्गाने तोडगा निघणे अपेक्षित आहे. जपान सध्याच्या सीमा रेषेत बदल करण्याच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांना विरोध करेल, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. श्रींगला यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.