इंदूर – भय्यू महाराज यांच्या आत्यहत्येप्रकरणी पुन्हा एकदा सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात भय्यू महाराज यांच्या एका शिष्याने थेट सीबीआयला पत्र लिहून विनंती केली आहे.
दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधत उच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. उज्जैन येथे भय्यू महाराजांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य भारत पोरवाल यांनी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती.
या मागणीवर ते आजही ठाम आहेत. यावेळी त्यांनी इंदूर जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सन्मान असल्याचे सांगितले. पण न्यायालयासमोर अद्याप सर्व पुरावे आणि कागदपत्रे सादर करण्यात आलेले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी इंदूर जिल्हा न्यायालयाने सेवादार विनायक आणि शरद यांना 6 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.