नवी दिल्ली- उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यापूर्वी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजप सरकारने देशातील युवकांना निष्क्रिय बनवले, अशी टीका सोनिया गांधींनी दूरदृश्य पद्धतीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.
युव आभ्यास करतात आणि नोकरी मिळवण्यासाठी तयारी करतात. मात्र भाजप सरकारने त्यांना एका जागेवर बसून रहाण्याची सवय लावली आहे. देशभरात 12 लाख सरकारी पदे रिक्त आहेत. मात्र युवकांना नोकऱ्या दिल्या जात नाही आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती आकाशाला स्पर्श करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपला दैनंदिन खर्च बागवणेही अवघड झाले आहे, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी केला.
लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे बंद होते. मैलोगणती चालण्याचा त्रास नागरिकांना होतो. मात्र मोदी, योगी ह बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यांनी या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि जनतेच्या वेदनांकडे चक्क डोळेझाक केली. सरकारने जनतेला कोणताही दिवललासा दिला नाही, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.
गेल्या पाच वर्षांपासून या सरकारने लोकांमध्ये भेद निर्माण करण्याव्यतिरिक्त काहीही केलेले नाही. शेतकरी मोठ्या कष्टाने धान्य पिकवतो. मात्र त्यांना चांगली किंमत किंवा खते आणि सिंचनाच्या सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे या निवडणूका जास्त महत्वाच्या आहेत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.