मुंबई – कॉमेडियन भारती सिंहने आपल्या उत्फूर्त विनोदामुळे आणि हजरजबाबीपणामुळे इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. ती इंडस्ट्रमध्ये जेंव्हा आली होती तेंव्हा आणि आतामध्ये खूप फरक आहे.
पूर्वी ती अगदी गुटगुटीत होती आणि आता ती खूपच सडपातळ दिसायला लागली आहे. तिने तब्बल 15 किलो वजन कमी केले आहे. तिने खाण्यावर खूपच नियंत्रण ठेवले आणि स्वतःमध्ये अगदी अमूलाग्र बदल घडवून आणले आहेत.
पूर्वी भारतीचे वजन तब्बल 91 किलो होते. ते आता 76 किलोपर्यंत कमी करण्यात तिला यश आले आहे. हा बदल घडवल्यानंतर आता तिला खबपच हेल्दी आणि फिट वाटायला लागले आहे. आता जिना चढल्यावर दम लागत नाही.
खूप हलके फुलके वाटते आहे, असे ती म्हणाली. पूर्वी तिला डायबेटिस आणि अस्थमाचाही त्रास होत होता. मात्र आता हे दोन्ही त्रास होत नसल्याचे ती म्हणाली. संध्याकाळी 7 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत ती काहीही खात नाही.
त्यामुळे आता स्वतःला स्क्रीनवर बघायला छान वाटते असे ती म्हणाली. “द कपिल र्शा शो’ बरोबरच ती “डान्स दीवाने 3′ मध्येही ती दिसते आहे.