मुंबई – राज्यात विविध क्षेत्रांमध्ये गंभीर परिस्थिती उद्भवली असताना, लाखो घरे उध्वस्त होत असताना मुख्यमंत्र्यांना आमदारांसाठी ३०० घरे देण्याचं कसं काय सुचू शकतं ? असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदारांच्या घरावरून ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे तसेच समस्त भाजपा महाराष्ट्र या निर्णयाच्या विरोधात असल्याचे त्यांनी फेसबूकवर पोस्ट लिहत नमूद केले आहे.
तसेच चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली म्हणाले,’ड्रायव्हरचे सहाय्यकचे पगार वाढवले. घरे देणार. कशासाठी पाहिजे घरं?, असा सवाल करतानाच आमदार व्हा म्हणजे तुम्हाला घरं मिळतील. पाच कोटींचा निधी मिळेल, असा कुणी काही आमदार होण्यासाठी निमंत्रणाचा नारळ दिला नव्हता. आमदारांचा रोष पत्करून हे मी बोलत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, महावितरणचे उपसंचालक सुमित कुमार निलंबित राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह 300 आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. महाविकास आघाडी सरकार केवळ घोषणा किंवा आश्वासन देत नाही तर ते पूर्णसुद्धा करते असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. “मुंबईचा विचार नेहमी सोन्याचे अंडी देणारी कोंबडी’ असाच केला गेला असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा सभागृहात संबोधताना म्हणाले, अर्थसंकल्पाचा नव्हे तर देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबईचे पुढे रुप कसं असणार आहे. जे मुंबई राहणारे कष्टकरी आहेत जे दुसऱ्याची घरं बांधतात परंतु त्यांची घरे नाही आहेत. मुंबईत अनेक जण येतात अन्न वस्त्र मिळतं. परंतु दिवसभर काम केल्यानंतर स्वतःच घरं नसते.’ असा निर्णय घेतला आहे.