राजगुरूनगर – जगण्यातील आनंद घेण्यासाठी अवतीभोवती असलेल्या माणसांबरोबर समूहाने काम केले पाहिजे. इतरांसाठी आपली काहीतरी भूमिका आहे ही जाणीव ठेवून उद्याच्या भविष्यकाळात स्वतःबरोबरच समाजाचे “आदर्श घटक’ बना असे आवाहन हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते यांनी केले.
कोहिनकरवाडी (ता. खेड) येथे हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य महाविद्यालय डेहणे, सरसेनापती हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय, रत्नाई महाविद्यालय राजगुरूनगरमधील विद्यार्थ्यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या सांगता कार्यक्रमात डॉ. मोहिते बोलत होते. याप्रसंगी सरपंच वैशाली कोहिनकर, संस्थेच्या खजिनदार सुरेखा मोहिते पाटील, कला वाणिज्य महाविद्यालय डेहणेचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मुळुक, रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य किरण शिंदे, प्रा. किरण भागवत, प्रा. अर्चना मंगळूर, आदर्श माजी सरपंच कुंडलिक कोहिनकर, कोहिनकरवाडीचे उपसरपंच संदीप उबाळे, कोंडीबा कोहिनकर, रघुनाथ कोहिनकर, निवृत्त कोहिनकर, दिलीप कोहिनकर, दत्तात्रय कोहिनकर, महादेव मुळे, प्रा राजाराम गरुड, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. राणी चव्हाण, प्रा. संजय गायकवाड, प्रा. कविता तातळे, मनीष रानवडे, उर्मिला ठक्कर, शिवाजी बिबे, शिवाजी गायकवाड, अश्विनी शिंगोटे यांच्यासह तिन्ही महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थी, ग्रामस्थ
उपस्थित होते.
डॉ. शिवाजीराव मोहिते म्हणाले की, कोणत्याही प्रकराची अपेक्षा न करता केलेले काम ब्रह्मांडापेक्षा मोठ आहे. स्वतःला चांगले समजण्यासाठी चांगल्या आचारांची विचारांची गरज आहे. येथील श्रमसंस्कार शिबिरात विद्यार्थ्यांनी नुसते श्रम केले नाही. तर त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. कोणतेही काम प्रतिष्ठेशिवाय होत नाही. प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आत्मीयता असावी, आत्मसन्मान, आत्मदकक्षता असावी लागते व स्वतःला त्यात झोकून देण्याची ऐपत असावी लागते, असे त्यांनी नमूद केले.
या शिबिरात मान्यवरांच्या स्वागतासाठी बनविण्यात आलेल्या स्थानिक फुलांचे उत्कृष्ट गुच्छ बनविलेल्या सेजल वाढणे व त्यांच्या टीमचे विशेष कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य किरण शिंदे यांनी, अहवाल वाचन किशोर भागवत यांनी, सूत्रसंचालन प्रा. महेश रानवडे यांनी तर शिलदार पावार यांनी आभार मानले