पुसेसावळ – हिंदू धार्मियांनी खूप सोसले आहे, त्यांच्या सहनशिलतेचा अंत कोणी पाहू नका, येथून पुढे जर हिंदू धर्मियांच्या भावना दुखवाल तर खबरदार, असा इशारा कराड उत्तरचे भाजपचे नेते धैर्यशील कदम यांनी दिला. छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी विरोधी पक्ष नेते आ. अजित पवार यांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पुसेसावळी येथे निषेध सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्य भीमरावकाका पाटील, भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ, महेशबाबा जाधव, दीपाली खोत, अमोल कदम, नितीन वीर, महेश पाटील, धनंजय पाटील, श्रीकांत पिसाळ, सतीश सोलापुरे, नवीन जगदाळे, बिपिन जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. धैर्यशील कदम म्हणाले, “”छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतो. संभाजी महाराजांनी हालअपेष्टा सहन केली. पण धर्म बदलला नाही. औरंगजेबला टक्कर दिली.
हिंदुस्थानातील तमाम विद्वानांनी संभाजी महाराजांना धर्मवीर असे म्हणले आहे. त्यामुळे बोलताना जरा भान ठेवून बोलले पाहिजे.” संभाजी महाराज यांच्याविरुद्ध बोलणे चुकीचे असून आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अजित पवार यांचा धिक्कार असो, असे सांगत निषेध व्यक्त केला. रामकृष्ण वेताळ यांचेही भाषण झाले. यावेळी विकी पाटील, अनिल पवार, कृष्णात यादव, अरुण घाडगे, शिवनाथ यादव, सुरज राक्षे, कालिदास यादव, बाबू पवार, प्रेम वाईकर, बापूराव कदम, नाना जाधव, सतीश पिसाळ, प्रशांत पिसाळ, मच्छिंद्र पिसाळ, धनाजी पिसाळ, सुधाकर पिसाळ, दत्ता साळुंखे, सतीश माळी, जयवंत जगदाळे, संदीप पवार, शीतल कुलकर्णी, संदीप चव्हाण, राजेंद्र चव्हाण, बाबुराव चौधरी, पिंटू मोरे, अक्षय चव्हाण व शिवप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते.