मुंबई – अयोध्येतील वादग्रस्त जमीन ही हिंदुंची असल्याचे सांगत ही जागा हिंदूंना देण्याचे आदेश तर अयोध्येतच पर्यायी ५ एकर जागा मुस्लिमांना मशिद बांधण्यासाठी देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला आहे. या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया देत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज बाळासाहेब हवे होते, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरे म्हणाले कि, अयोध्येतील आपल्या राम मंदिरासाठी करसेवकांनी जे बलिदान केले त्याचे आज सार्थक झाले. देशातील बहुसंख्य जनतेच्या मनातील भावना आणि वास्तव लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार! राम मंदिर उभे राहावे तसे रामराज्य यावे अशीही अपेक्षा आहे. तसेच राम मंदिराचा आज निर्णय आला यातून सर्वात एक गोष्ट जाणविली की आज बाळासाहेब हवे होते, हा निर्णय ऐकायला ते हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता. इतके वर्ष जो संघर्ष झाला त्या संघर्षाची चीज झाले, अशा शब्दात राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
#AYODHYAVERDICT #RamMandir #AyodhyaJudgment pic.twitter.com/Lgy2JapDZD
— Raj Thackeray (@RajThackeray) November 9, 2019