नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अलाहाबाद न्यायालयाने जागा तीन अर्जदारांमध्ये विभागण्याची चूक केली असल्याचे म्हटले. वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येईल असे सांगत तर मुस्लिमांना मशिदीसाठी वेगळी 5 एकर जमीन देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने तीन महिन्यात योजना तयार करेल. राम मंदिर बांधण्यासाठी सरकार ट्रस्ट तयार करेल. तर अयोध्येत महत्त्वाच्या ठिकाणी मशीद बनवण्यासाठी जागा दिली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्शवभूमीवर देशभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहेत.