नवी दिल्ली – भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू अजय जयराम याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली. तब्बल दोन दशकांच्या कारकीर्दीला त्याने रामराम करत पुढील काळात प्रशिक्षक किंवा तत्सम क्षेत्रात कार्यरत राहणार सल्याचेही त्याने म्हटले आहे.
मी आज जो काही आहे, त्याचे श्रेय बॅडमिंटनला जाते. या खेळाने माझ्या आयुष्याला नवी दीशा दिली. आता खेळापासून काही काळ दूर राहणार असून एमबीएचे शिक्षण पूर्णकरणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. माझ्या दोन दशकांच्या कारकीर्दीचा निरोप घेताना अतिशय भावनिक झालो आहे, असे जयरामने सांगितले.
जयरामने डच ओपन बॅडमिंटन स्पर्धा दोन वेळा जिंकली होती. 2015 साली कोरिया ओपन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले होते.