मुंबई – आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात वेळेत षटके पुर्ण न केल्याबद्दल कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला तब्बल 12 लाख रुपयांचा दंड केला गेला आहे.
या सामन्यात दिल्लीने मुंबईचा चार गडी राखून पराभव केला व स्पर्धेत विजयी सलामी दिली. मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध षटकांचा वेग योग्य राखला नाही.
रोहितने आयसीसीच्या नियमांचा पहिल्यांदाच भंग केल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. आता हेच पुन्हा घडले तर त्याला आणखी मोठ्या रकमेचा दंड केला जाऊ शकतो तसेच डीमेरीट गुणही दिले जातील.