मुंबई – दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यप याच्यावर करण्यात आलेल्या वादाच्या प्रकरणात आता नवं वळण आले आहे. पायल अनुराग कश्यपवर आरोप केले आहेत. यानंत अनुराग कश्यप याच्यावर अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कश्यप यांची चौकशी केली नाही. सात दिवसांत त्याच्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी दिला.
वृत्त वाहिनीशी बोलतांना रामदास आठवले म्हणाले,’अभिनेत्री पायल घोषच्या तक्रारीला आता सात दिवस झाले तरी कश्यप यांना चौकशीसाठीसुद्धा बोलावण्यात आले नाही. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योग्य कारवाई केल्यास नव्या कलाकारांचे कोणीही शोषण करणार नाही. त्यामुळे येत्या सात दिवसांत कश्यप यांना पोलिसांनी अटक करावी. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. माध्यमांशी संवाद साधतांना त्यावेळी पायल घोषही उपस्थित होती.’
काय आहे संपूर्ण प्रकरण
2015 साली अनुरागने आपल्यावर त्याच्या घरी अतिप्रसंग करून, डांबून ठेवल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला आहे. या अनुषंगाने अभिनेत्रीने तिच्या वकीलांसह गुन्हा नोंदवण्यासाठी प्रथम ओशिवरा पोलीस ठाणे गाठले होते.