मंचर -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील निरगुडसर येथील शेतकरी संदीप वळसे यांच्या अडीच एकर क्षेत्रातील ऊस विजेच्या तारांचे शॉर्टसर्किट होऊन पडलेल्या ठिणगीमुळे जळाला. यामुळे संबधित शेतकऱ्याचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
निरगुडसर-वळसेमळा (ता. आंबेगाव) येथील शेतकरी संदीप वळसे यांच्या शेतातून जाणाऱ्या महावितरणाच्या विजेच्या तारांवर स्पार्किंग होऊन शॉर्टसर्किट झाल्यामुळे या तारांमधून आगीच्या ठिणग्या उसाच्या शेतात पडून उसाला आग लागली, त्यामुळे उसाने पेट घेतला.
या शेतात ऊस मोठ्या प्रमाणात असल्याने आग आटोक्यात आणता आली नाही.या आगीमुळे अडीच एकर ऊस जळून गेला असून, संबधित शेतकऱ्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सागर गायकवाड यांनी भेट देऊन पाहणी केली.